२७ मार्च, २०२०

संचारबंदी मोडणाऱ्यांना लाठीचा प्रसाद

मुंबई, दादासाहेब येंधे : करोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध प्रयत्न करीत असताना नागरिकांना अजूनही करोनाचा धोका समजलेला दिसत नाही. संचारबंदी आणि लॉक डाऊन जाहीर केल्यानंतरही शहरांत नागरिक जीवनाश्यक वस्तू खरेदी करण्याच्या नावाखाली बिनधास्तपणे संचार करत आहेत. औषधे खरेदी करण्याच्या नावाखाली फेरफटका मारत गर्दी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखविण्यास सुरूवात केली आहे. 
करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लॉक डाऊन, संचारबंदी जाहीर केली असली तरी नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याचे निदर्शनास येत आहे. परिणामी, नागरिकांना पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागत आहे. तर काही ठिकाणी पोलिसांवरच हात उगारल्याच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. पोलीस हा सुद्धा माणूस आहे. त्यांना कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मदत करणे गरजेचे आहे.

पोलिसांवर हल्ला झाल्याचा व्हिडिओ


गावाकडे जाऊन विहिरीत एकत्र पोहण्याचा मनमुराद आनंद घेताना

संचारबंदी असतानाही बाईकस्वार फिरताना











सोशल मिडियांवर व्हायरल झालेले काही व्हिडिओ.











कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा