२६ जुलै, २०१९

तिकिटांचे दर कपात करा


तिकीट दरांमध्ये कपात करावी
एसटीच्या स्पर्धक असलेल्या ऐरावत आणि खासगी बससेवेचे तिकीट दर तुलनेने कमी आहेत. त्यातच कर्नाटक एसटी महामंडळात मागणी-पुरवठा तत्वानुसार तिकिटांचे दर कमी करण्यास मुभा आहे. महाराष्ट्रात याप्रकारे तिकीट दरांत चढ-उतार करता येत नाही. त्याच धर्तीवर एसटी महामंडळाने प्रवाशांना आपल्याकडे वळविण्यासाठी तिकीट दरांमध्ये कपात करावी. मागणीनुसार तिकीट दर कमी करण्याचे सूत्र अवलंबल्यास शिवशाहीचे प्रवासी नक्कीच वाढतील.-दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई




२५ जुलै, २०१९

कारवाईची रक्कम कमी करा

सामना

दंडात्मक कारवाईची रक्कम कमी व्हावी


रंगारी बदक चाळ गणेशोत्सव मंडळ कमिटी स्थापन





रंगारी बदक चाळ रहिवाशी संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कमिटी स्थापन

आदर्श कथानकांचे सादरीकरण करणारा व ती परंपरा जोपासणारा अशी ख्याती असलेल्या काळाचौकी या कामगार विभागातील रंगारी बदक चाळ रहिवाशी संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे ८० वर्ष मोठ्या जल्लोष साजरे होणार असून सन २०१९-२० या वर्षाकरिता नवीन कार्यकारिणी जाहीर झाली असून अध्यक्ष श्री. भाई मयेकर, कार्याध्यक्ष श्री. अनिल हेलेकर,  श्री. दत्ता झोडगे सरचिटणीस तसेच श्री. शंकर साळवी खजिनदार यांची सर्वानुमते निवड झाली आहे. अशी माहिती मंडळाचे प्रसिद्धीप्रमुख दादासाहेब येंधे यांनी दिली आहे.

२३ जुलै, २०१९

कारवाईचे कागदी घोडे


रात्रीच्या क्लिनिक्सची गरज


श्रीपंत भक्त मंडळ आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सव


मुंबई,दादासाहेब येंधे : श्रीपंत भक्त मंडळ मुंबई आयोजित गुरुपूर्णिमा उत्सव  मेळावा व शतकोत्तर  रौप्य महोत्सवी वर्ष आरती अवधूत महासोहळा  रविवार दिनांक २१ जुलै रोजी ना. म. जोशी मार्ग सेकंडरी स्कूल डेलाईल  रोड येथे  राज्यभरातील हजारो  पंत भक्तांच्या उपस्तिथीत  पार पडला.  तदप्रसंगी उत्सवाची सुरुवात श्रीपंत महारांजांच्या नामस्मरनाणे झाली, यानंतर  सीतामाई  महिला भजन  मंडळ व अण्णा वारंगे भजन मंडळ , आणि श्री सुहास सतोसकर  (सावंतवाडी ) यांच्या सुमधुर आवाजानि भक्तगणांनी कीर्तनाचा आनंद लुटला, तसेच  बाबा सुर्वे , विवेक वैद्य , सुधीर वैद्य , भालचंद्र वांगणेकर यांचे  भक्तगनाना आरती अवधुतावर बोधविचार देण्यात आले. संध्याकाळी ७ वाजता  श्री पंत महाराज लिखित जय जय आरती अवधूत। या आरतीने  उत्सवाची सांगता  करण्यात आली. सदर मंडळाचे  अध्यक्ष  देवदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न  झाला. यावेळी  जीवनगौरव , क्रीडा विशेष , आणि विद्यार्थी गुणगौरव  पुरस्कार देण्यात आले प्रसंगी  दत्ता सातोसे, अभिजित पंत आदी उपस्थित होते.






विद्यार्थी गुणगौरव व हेल्मेट वाटप सोहळा संपन्न

विद्यार्थी गुणगौरव व हेल्मेट वाटप सोहळा संपन्न
सिर सलामत तो पगडी पचास याप्रमाणे प्रत्येकाने हेल्मेटचा वापर जर केला तर घटने प्रसंगी हेल्मेटमुळे आपले डोके वाचले तर माणूस संकटातून बाहेर पडू शकतो. त्यामुळे सर्वांनी राज्य शासनाने सुरू केलेली योजना म्हणजेच प्रत्येकाने हेल्मेटचा वापर नक्की करावा. कारण अपघातांमध्ये डोक्याला इजा पोहोचली तर माणूस दगावू शकतो. मात्र हेल्मेट घालून दुचाकीवर प्रवास करत असताना पुढे व मागे असणाऱ्या दोघांनीही हेल्मेटचा जरूर वापर करावा. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने गेल्या दोन वर्षांपासून पत्रकारांसाठी मोफत हेल्मेट हे अभियान सुरु केले. या अभियानाचा नक्कीच आमच्यासारख्या अधिकारीवर्गाला देखील अभिमान वाटतो असे येथे उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते साहेब यांनी देखील या अभियानाचे कौतुक केले त्यांच्याहस्ते देखील पुणे येथील भोसरी अधिवेशनात पत्रकारांना हेल्मेट वाटप करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या उपक्रमाचे राज्यभरात कौतुक होत असले तरीही या संघाने पत्रकार हा देखील एक समाजसेवक असून त्यांच्या कार्यातून नक्कीच वेगवेगळे आदर्श उपक्रम राबवत असून आज नवी मुंबई भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत शालेय साहित्य तसेच इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा याठिकाणी संपन्न झाला. हा सोहळा हा या विद्यार्थ्यांना भावी काळात आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहून इतर विद्यार्थ्यांनी या विद्यार्थ्यांचा आदर्श घ्यावा असे आव्हान उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र सावंत, यांनी काल नवी मुंबई कोपरखैरणे येथे स्वामी विवेकानंद विद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.  यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे महासचिव विश्वासराव आरोटे कोकण विभागीय अध्यक्ष भगवान  चंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत जगदाळे, पोलीस निरीक्षक बी औटी, ठाणे जिल्हा सचिव नरेश पाटील, बाळासाहेब ठाकरे ॲकडमी संचालक कीशोर शेवाळे, जेष्ठ पत्रकार बाळासाहेब मिरजे, स्वामी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्योती सिंग महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेंद्र बोडके सरचिटणीस प्रवीण हांडे, खजिनदार दशरथ चव्हाण,आदी उपस्थित होते , यावेळी प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी नवी मुंबई परिसरातील गोरगरीब विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती तर आरोटे यांनी बोलताना सांगितले की पत्रकार हा देखील एक समाजसेवक असून पत्रकारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन काही लोकांचा वेगळा असला तरी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून राज्यभरात या उपक्रमाचे आयोजन केले जात असून गेल्या अठरा ते वीस वर्षांपासून या कार्यक्रमांचे संपूर्ण राज्यभरात वितरण केले जाते महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित असताना पत्रकारितेचा माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न व त्याचबरोबर आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो ही उदांत भावना मनी धरली तर सर्व काही सुरळीत असते अधिकारी व पत्रकार यांच्यामधील नेहमीचा संपर्क यामुळेच आजच्या कार्यक्रमाला अधिकार यांची असलेली उपस्थिती ही सर्वांना नक्कीच चकित करणारी ठरेल मात्र विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्या हस्ते आज आपला सन्मान झाला आहे त्या अधिकाऱ्यांचा आदर्श ठेवला तर नक्कीच उद्याच्या आदर्श भारताचे नागरिक आपण व्हाल. असे उपस्थितांना संबोधित करताना म्हटले. राज्य मराठी पत्रकार संघाच्या ध्येय धोरणानुसार राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून राज्यभरात या अभियानाचा प्रारंभ गेल्या एक महिन्यापासून सुरू असून संपूर्ण राज्यभरात गुणवंत विद्यार्थी गवळी मोफत शालेय साहित्य वाटप व मोफत हेल्मेट वाटप हे अभियान सुरू करून राज्याचे राज्य संघटक संजय भोकरे राज्याध्यक्ष राजमाने कार्याध्यक्ष वसंतराव मुंडे प्रदेश प्रसिद्धीप्रमुख नवनाथ जाधव यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात हा सोहळा संपन्न होत असून पत्रकारांनी देखील चांगल्या कामाचे कौतुक करतात. त्या दृष्टीने आपण देखील आपल्या लिखाणातून दर्जेदार लिखाण करून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम केले पाहिजे असे आव्हान विश्वास आरोटे यांनी व्यक्त केले तर कोकण विभागीय अध्यक्ष भगवान शिंदे यांनी आपल्या मार्मिक पाषाणातून विद्यार्थ्यांनी आदर्श अधिकाऱ्यांचा आदर्श मनी ठेवून आपल्या आई-वडिलांचे स्वप्न अंगीकारून उद्याचा आदर्श अधिकारी जरी होता आले नाही तरीही आदर्श उद्योजक आदर्श शेतकरी आदर्श व्यापारी हे होण्याचे स्वप्न मनी बाळगावे, एवढे करून कुठेही यश मिळाले नाही तरी आदर्श पेपर वितरण हे देखील काम आपण करू शकता या देशाचे राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी देखील पेपर वितरण करून आपले शिक्षण पूर्ण केले व वडिलांना मदत केली आणि या देशाचे राष्ट्रपती होण्याचे स्वप्न त्यांनी साकार केले म्हणून विद्यार्थ्यांनी आदर्श कुणाचा तरी डोळ्यासमोर ठेवून आपले काम करावे असे सांगितले. यावेळी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व मोफत पत्रकारांना हेल्मेट वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेंद्र बोडके यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रविण हांडे,तर स्वागत खजिनदार दशरथ चव्हाण , आभार जिल्हा उपाध्यक्ष कुंडलिक कानगुडे यांनी मानले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय नरवडे, प्रमोद माने, अशोक लांडगे , दिनकर गायकर,खंडु घुले, धनंजय कुरकटे, अशोक काळे, संजय म्हात्रे,दिलीप म्हात्रे ,रवी वाळुंज, अविनाश आरोटे, दिनेश पाटील,दत्ता गायकवाड, विजय जुनघरे,आदिंनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. अशी माहिती दादासाहेब येंधे यांनी दिली आहे.




१८ जुलै, २०१९

फेरीवाल्यांची मुजोरी


मोफत वह्या वाटप व विद्यार्थी गुणगौरव सोहळा

मुंबई, दादासाहेब येंधे: कै. अंबरनाथ नर यांच्या स्मरणार्थ गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून रंगारी बदक चाळ, श्रीकृपा बिल्डिंग काळाचौकी येथे समाजसेवक श्री. सत्यवान नर यांचेतर्फे वह्या वाटप करण्यात आल्या.
यानिमित्त महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री नामदार श्री. आशिष शेलार यांच्या शुभहस्ते सदर कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. इयत्ता १ ली ते १५ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व वह्या वाटप करण्यात आल्या. कार्यक्रमदरम्यान हेमंत मकवाना, विनायक येंधे, अमित पवार, दत्तात्रय माने, गणेश काळे, संतोष सकपाळ, विकी जैन, प्रविण पावसकर, दया घाडी, सदाशिव गोनबरे, नागेश तांदळेकर, रवी जाधव, राजन आंबेरकर, शंकर साळवी, राकेश पवार तसेच रंगारी बदक चाळीतील मित्र परिवार मोठया संख्येने उपस्थित होता.




१७ जुलै, २०१९

आणखी किती बळी घेणार?

आणखी किती बळी घेणार?
मुंबई, दादासाहेब येंधे : डोंगरी येथील तांडेल स्ट्रीटवरील केसरबाई-२ तीन मजली अनधिकृत इमारत मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास  अक्षषरशः जमीनदोस्त झाली. या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा पुरुषांचा, चार महिलांचा समावेश असून इमारत एकाच जागेवर कोसळल्याने घटनास्थळी मोठा ढिगारा होऊन त्याखाली २० ते २५ जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. केसरबाई-२ ही अनधिकृत इमारत डोंगरी येथे उभारण्यात आली होती. केसरबाई मध्ये चार ते पाच कुटुंब आणि काही व्यवसायिक गाळे होते. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता ही इमारत थोडी हलल्यासारखी वाटली आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. वरचे तीन मजले अक्षरशः पत्त्यासारखे कोसळले असे येथील रहिवासी सांगतात. इमारतीजवळ असणाऱ्या बेकरीतील काही लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य करण्यास सुरुवात केली. त्यानंतर एनडीआरएफ, पोलीस, अग्निशामक दल यांनी रात्री ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढले होते. यापैकी दहा जणांचा मृत्यू झाला असून ढिगारा उपसण्याचे काम रात्रभर चालू होते.
डोंगरीतील अनधिकृत इमारत कोसळण्याच्या वृत्ताने मुंबईमधील धोकादायक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांचा काळजाचा ठोका चुकला आहे. म्हाडाच्या इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडे संक्रमण शिबिरे पुनर्रचित इमारती उपकरप्राप्त इमारतींच्या देखभालीची जबाबदारी आहे. खाजगी मालकीच्या असलेल्या इमारती जुन्या झाल्यानंतर त्यांची जबाबदारी म्हाडाकडे सोपवली जाते. अशा अनेक इमारती धोकादायक अवस्थेत असल्याचे येथील रहिवाशी सांगतात. म्हाडाकडून अतिधोकादायक इमारत त्यांना वारंवार नोटीस बजावण्यात येतात. पण, बरेच रहिवाशी आपले मूळ घर सोडून संक्रमण शिबिरात जाण्यास तयार होत नाहीत. अशा दक्षिण मुंबईत मोठ्या संख्येने सेस इमारती असून संक्रमण शिबिरात गेल्यास आपल्याला मूळ घरांचा ताबा कधी मिळेल याची त्यांना हमी मिळत नाही. तसेच संक्रमण शिबिरांचीही अवस्था चांगली नाही. तेथेही रहिवाशांच्या तक्रारी आहेत. मंडळाच्या कारभारावर विश्वास नसल्याने धोकादायक इमारतीतील लोक आपले मूळ घर सोडून जाण्यास तयार नाहीत.
केसरबाई-२ ही इमारत अनधिकृतच होती असे गृह निर्माण मंत्री  विखे पाटील यांनी विखे पाटील यांनी जे. जे.  रुग्णालय मध्ये जखमींची चौकशी करण्यासाठी आले असताना घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.  या इमारतीच्या शेजारील इमारतीला पुनर्विकासासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आले होते.  धोकादायक इमारत म्हणून महापालिका आणि म्हाडा दोघांकडूनही शेजारील इमारतीला नोटीस देण्यात आली होती. मात्र केसरबाई-२ या इमारती संदर्भात संपूर्ण माहिती इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ यांकडे असणे अपेक्षित होते. पण, तशी नोंद सरकारकडे नसल्याने त्याला नोटीस देण्यात आली नव्हती. खरेतर अशा प्रकारची इमारत उभी राहत असतानाच वार्ड अधिकारी, म्हाडा अधिकाऱ्यांनी कारवाई करणे अपेक्षित होते. ते या घटनेस जबाबदार आहेत. आणि त्याबाबतीत कारवाई होणे गरजेचे आहे. शंभर वर्षे जुन्या या इमारतीला लागुन १९९० च्या दरम्यान अनधिकृत बांधकाम केले जाते. मूळ इमारत धोक्कादायक ठरविली जाते. आणि तरीदेखील सरकारी यंत्रणांच्या हे बांधकाम अनधिकृत असल्याचे लक्षात येत नाही. हा बेजबाबदारपणाचा कळसच म्हणावा लागेल.

३ जुलै, २०१९

ज्येष्ठांना सहकार्याचा हात द्या


कारवाईचे कागदी घोडे


कारवाईचे कागदी घोडे


कारवाईचे कागदी घोडे


मोफत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न

मोफत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न
मुंबई, (दादासाहेब येंधे): विद्यार्थी जीवनात मुले शिक्षणापासून दूर जाऊ नयेत. त्यांना वेळेत शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे या हेतूने प्रेरित होऊन कै. अंबरनाथ नर यांच्या स्मृती प्रित्यर्थ माननीय समाजसेवक सत्यवान नर यांच्या हस्ते रविवारी (३० जून २०१९ रोजी) कल्याण येथील शाळेत मोफत शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.
मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कल्याण येथील अंतरली गावात जिल्हा प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. सोबतच पर्यावरण संवर्धन विषयक माहिती देऊन शाळेतील आवारात विद्यार्थ्यांना सोबत घेऊन वृक्षारोपण करण्यात आले. प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सोनावणे सर, श्री. पांचाळ सर, तसेच कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक सत्यवान नर समवेत हेमंत मकवाना , विनायक येंधे, अमित पवार, दत्तायत्र माने, गिरीश मकवाना, गणेश क्षीरसागर, गणेश काळे, प्रशांत हांदे, नागेश तांदळेकर, महेश पटेल, शंकर साळवी, रोहन परब, साहेबराव शिंदे, राजन आंबेरकर, श्रेयस घाटकर, दत्ता कोरडे, रवी जाधव, विकी जैन, श्रीकांत चौरसिया, तुषार घाडी, नवनाथ पानसरे, रामचंद्र राणे, विजय शिर्के, संदीप सकपाळ, श्लोक नर, दर्श मकवाना, रंगारी बदक चाळीतील कार्यकर्ते तसेच अंतरली गावातील ग्रामस्थ मंडळी आदी मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.