१७ मार्च, २०२०

कोरोनाला घाबरू नका, काळजी घ्या

कोरोनाला घाबरू नका, काळजी घ्या
जगात तसेच आपल्या देशात आढळलेल्या कोरोनाच्या रुग्णांमुळे राज्यातही रुग्ण आढळल्याच्या अफवांना ऊत आला आहे. मात्र, अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, तर त्याला टाळण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अवघे एक ते दोन टक्के आहे, त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. नागरिकांनी खबरदारी म्हणून गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. आपली दैनंदिन कामे ऑनलाइन आणि मोबाइलचा वापर करून कामे करावीत. मिटिंगपेक्षा फोन कॉलकरून अशा गोष्टी साधा. वेळोवेळी हात धुवावेत. कपडे स्वच्छ ठेवावेत. मास्क न मिळाल्यास स्वच्छ रुमाल वापरावा. चिकन अंडी योग्य प्रमाणात शिजवून खावीत. इम्युनिटी वाढवा. अशी काळजी घेतल्यास कोरोनाची लागण होण्याची शक्यता नक्कीच कमीच होईल. नागरिकांनी कोरोनाविषयीचे व्हॉटसअप, फेसबुकवर येणारे मेसेजेस वाचणे टाळावे. कोणतीही समस्या असेल तर पालिकेच्या किंवा शासनाच्या हेल्पलाइन नंबरवर संपर्क करून माहिती घ्यावी. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उगाचच अफवा पसरवू नये. परदेशातून आलेल्या काही नागरिकांमुळे ह्या विषाणूंचा प्रादुर्भाव काही नागरिकांना झालेला आहे. त्यामुळे जितक्या काटेकोरपणे प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रत्येक व्यक्तीकडून पाळल्या जातील तितके यातून नुकसान टळणार आहे. ज्या सोशल मीडियातून भीतीचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला आहे, त्याच माध्यमाचा वापर करून याबाबतीत लोकांची मने तयार करणे आणि अशी सकारात्मक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारीही प्रत्येकाने पार पाडणे आवश्यक आहे. स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू, टी. बी., अशा आजारांना भारत सामोरा गेलेला आहे. कोरोना हा काही त्याहून वेगळा नाही. फक्त तो नव्याने आल्याने त्यावरील उपायांची व्यवस्था होईपर्यंत प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे.  -दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई


३ टिप्पण्या: